अनोखा जल्लोष; उंटावरून साखर वाटून केला आनंद साजरा

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत

अंबाजोगाई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कारण, गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच अंबाजोगाई शहरातील प्रमुख रस्त्यांवरून उंटावरून मिरवणूक काढून नागरिकांना 5 क्विंटल साखर वाटून आपला आनंद साजरा केला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधींना सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळणे ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. न्यायमूर्ती गवई यांनी राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राहुल गांधी यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर राहुल गांधी यांच्या विरोधात महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्या वतीने कोर्टात अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर, पूर्णेश मोदी यांच्या वतीने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना अधिक शिक्षा सुनावण्याचे निकष काय आहेत. त्यांना कमी शिक्षा देखील दिली जाऊ शकते, असं म्हटलं. याशिवाय त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा अधिकार देखील अबाधित राहिला असता, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना 23 मार्च रोजी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यत्व ही निलंबित करण्यात आलं होतं.

राहुल गांधी यांनी त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं देखील त्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे या निकालानंतर राहुल गांधी यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. ती म्हणजे ‘काँग्रेसने नफरत के खिलाफ सत्यमेव जयते, जय हिंद’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाई शहरात शनिवार, 5 ऑगस्ट रोजी दुपारी शहरातील नवा मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिमेंट रोड गुरूवार पेठ ते श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात या रॅलीचा समारोप झाला. राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कॉंग्रेसच्या वतीने प्रार्थना केली. प्रमुख रस्त्यांवरून वाजत गाजत, फटाके फोडून, राहूल गांधी आणि काँग्रेस जिंदाबादच्या गगनभेदी घोषणा देत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. आपल्या आनंदात त्यांनी सर्वसामान्य माणसांना सहभागी करून घेतले. उंटावरून 5 क्विंटल साखर वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *