मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या २१० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या १५७४ झाली आहे, तर आज शुक्रवारी १३ जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या ११० झाली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित १८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३३ हजार ९३ नमुन्यांपैकी ३० हजार ४७७जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८८ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ९२७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात आज १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १० तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी १ आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ९ पुरुष तर ४ महिला आहेत. आज झालेल्या १३ मृत्यूंपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत, तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये (८५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशीलः
मुंबई महानगरपालिकाः १००८ (मृत्यूः ६४)
ठाणे जिल्हाः ०३
ठाणे मनपाः २८ (मृत्यूः ०३)
नवी मुंबई मनपाः ३२ (मृत्यूः ०२)
कल्याण डोंबवली मनपाः ३४ (मृत्यूः ०२)
उल्हासनगर मनपाः ०१
भिवंडी-निजामपूर मनपाः ००
मीरा भाईंदर मनपाः २१ (मृत्यूः ०१)
पालघरः ०३ (मृत्यूः ०१)
वसई-विरार मनपाः १२ (मृत्यूः ०३)
रायगडः ००
पनवेल मनपाः ०६ (मृत्यूः ०१)
ठाणे मंडळ एकूणः १४० (मृत्यूः ७७)
नाशिक जिल्हाः ०१
नाशिक मनपाः ०१
मालेगाव मनपाः ०५ (मृत्यूः ०१)
अहमदनगर जिल्हाः ०९
अहमदनगर मनपाः १६
धुळे जिल्हाः ००
धुळे मनपाः ००
जळगाव जिल्हाः ०१
जळगाव मनपाः ०१ (मृत्यू ०१)
नंदूरबारः ००
नाशिक मंडळ एकूणः ३४ (मृत्यू ०२)
पुणे जिल्हाः ०७
पुणे मनपाः २१९ (मृत्यू २५)
पिंपरी चिंचवड मनपाः २२
सोलापूरः ००
सोलापूर मनपाः ००
साताराः ०६ (मृत्यूः ०१)
पुणे मंडळ एकूणः २५४ (मृत्यूः २६)
कोल्हापूर जिल्हाः ००
कोल्हापूर मनपाः ०५
सांगली जिल्हाः २६
सांगली-मिरज-कुपवाड मनपाः ००
सिंधुदुर्गः ०१
रत्नागिरीः ०५ (मृत्यू ०१)
कोल्हापूर मंडळ एकूणः ३७ (मृत्यू ०१)
औरंगाबाद जिल्हाः ०१
औरंगाबाद मनपाः १६ (मृत्यू ०१)
जालनाः ०१
हिंगोलीः ०१
परभणी जिल्हाः ००
परभणी मनपाः ००
औरंगाबाद मंडळ एकूणः १९ (मृत्यूः ०१)
लातूर जिल्हाः ००
लातूर मनपाः ०८
उस्मानाबादः ०४
बीडः ०१
नांदेड जिल्हाः ००
नांदेड मनपाः ००
लातूर मंडळ एकूणः १३
अकोला जिल्हाः ००
अकोला मनपाः १२
अमरावती जिल्हाः ००
अमरावती मनपाः ०४ (मृत्यू ०१)
यवतमाळः ०४
बुलढाणाः १३ (मृत्यू ०१)
वाशिमः ०१
अकोला मंडळ एकूणः (मृत्यूः०२)
नागपूरः ००
नागपूर मनपाः २५ (मृत्यूः०१)
वर्धाः ००
भंडाराः ००
गोंदियाः ०१
चंद्रपूरः ००
चंद्रपूर मनपाः ००
गडचिरोलीः ००
नागपूर मंडळ एकूणः २६ (मृत्यूः ०१)
इतर राज्येः ०९
एकूणः १५७४ मृत्यूः ११०